पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती,अखेर बचेरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
सोलापुर, सातारा,सांगली सिमारेषेवर व डोंगर रांगेच्या कुशीत दडलेलं दुष्काळी गाव म्हणुन ओळखले जाणारे बचेरी या गावाची स्वतंत्र्यानंतर ही पाण्याची फरपट आजही सुरुच आहे. माजी आमदार कै. गणपतरावजी देशमुख,माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहीते पाटील यासारखी रत्न या तालुक्याने विधानसभेत पाटवली.
सद्या हा तालुका विधानसभेसाठी राखीव प्रवर्गात आहे. परंतु कोणताही नेता बचेरीच्या जनतेची तहान भागवु शकला नाही. वापरा आणि फेकुन द्या या उक्तीप्रमाणे ही नेतेमंडळी बचेरीकरांचा फक्त वापर करतात आणि निवडुन आले की वार्यावर सोडुन देतात. निवडनुक आली की अश्वासनांची खैरात ही नेतेमंडळी करतात. भारत देश स्वतला विकसित देश म्हणतो आणि बचेरीसारख्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी कोसो मैल पायपीठ करावी लागते ही लाजिरवाणी बाब आहे.
पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होणारी पिळवणुक आता ग्रामस्थांना सहन न झाल्यामुळे येथुन पुढे येणार्या पंचायत समिति,जिल्हा परिषद,आमदारकी, खासदारकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतला तशी बचेरीतील सर्व पक्षीय नेतेमंडळींची बैठक गावात संपन्न झाल्याचे समजते. आता ग्रामस्थांची ही एकी अशीच कायम राहते का? वरिष्ठ नेते आपआपल्या कार्यकर्त्यांना खुश करुन बहिष्कार मोडीत काढतात का? निरा देवधर योजनेत ही गावे समावेश होतात का? यांची उत्सुकता आता पिलीव गटातील लोकांना लागली आहे