त-हाडी परिसरत मराठी नववर्षाचे उत्साहात ‘गुढी उभारीत’स्वागत
ग्रामीण भागातील पारंपारीक गुढी तर काही ठिकाणी भगवी पताका
त-हाडी ता.२४ मार्च २३= मराठी वर्षातील चैत्र मासारंभाला गुढी पाडव्या पासुन प्रारंभ होतो.या गुढी पाडवा उत्सवाला बळीराजा शेतातील नांगराचे तास काढुन शेती मशागतीला प्रारंभ करतात.तर शेती कामासाठी सालगडी लावण्याचा मुहूर्त याच मुहूर्तावर काढल्या जातो.त्यामुळे हिंदु धर्मा मध्ये चैतन्याच्या गुढीला अनन्य साधारण महत्व आहे.
गुढी पाडवा उत्सवाला सकाळ पासुन नागरिकांची लगबग दिसुन आली.अंब्याचा घोस,कडुनिंचा डघळा,पुष्पहार,आरघडा,साखरेची,कोरी नववार साडी,खण,एका उंच बांबुच्या काठीला विधीवत पुजन करीत मोठ्या दिमाखात उभारण्यात आल्या.रामायणा कथेतीर श्रीरामप्रभु यांनी रावणाचा विजया दशमीला वध केल्या नंतर गुढी पाडवा या नववर्षाच्या मुहूर्तावर त्यांचे स्वागत म्हणून गुढी उभारल्या जाते.तर चैत्र महिन्यातील वृक्षाला नवीन पालवी फुटते.गुढी पाडव्याला आयुर्वेदातील महत्व प्राप्त आसलेल्या वृक्षांच्या फांद्या आरोग्या साठी महत्त्वाचा घटक आहे.
त्यामुळे मोहरलेला कडुलिंब,खरसडा,आंब्याचा डहाळा यांचा पाला अभ्यंगस्नाना च्या गरम पाण्यामध्ये वापर करून लाभ होतो.ही सुध्दा अख्याईका आहे.तर गुढी उभारणीतील कलश,कडुलिंब,पुष्पहार,जरीची साडी,वेळुची काठी,श्रीफळ,हळद कुंकू या शुभकार्यातील प्रेरणादायी वस्तू आसल्याने मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभारणी साठी वापरून उत्साह वाढविला जातो.आजही.गुढी पाडव्याला रानमेव्यातील बिबा.चारोळी सारख्या वस्तुचा खाद्यपदार्था मध्ये आजच्या दिवशी वापर केल्या जातो.त्यामुळे गुढी पाडवा हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतो.