सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली
सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
गेली एक महिना झाले पिण्याच्या पाण्यासाठी बचेरी गावातील ग्रामस्थ भटकंती करत आहेत. कोसो मैल पायपीठ करुन पाणी आणावे लागते. विहरी कोरड्या पडल्या पाण्यासाठी जनावरांनी टाहो फोडला. सरपंच महादेव पाटील व उपसरपंच मोहन शिकारे यांनी टेंकर मागणीसाठी आमदार,खासदार, पंचायत समिती पर्यत उंबरठे झिजवले परंतु पदरी निराशा आली. गावाने पाण्यासाठी हांबरडा फोडला कुणालाही दया आली नाही मात्र देवदुत म्हणुन राजेवाडी कारखान्याचे चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी ही समस्या दुर केली पिलीव कॅनलवरुन कारखान्यासाठी आणलेल्या चालु पाइपलाईनला वाटर सप्लाय विहरीचा पाईप जोडला यामुळे बचेरीत आनंदाचे वातावरण पसरले असुन शेषगिरी राव अंकल हा माणुस देवापेक्षा कमी नाही अशी चर्चा बचेरी गावात रंगत आहे.
सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन मा सेषागिरी राव सर यांना
मंगळवार दि 21/03/2023 रोजी बचेरी गावचे शिष्टमंडळ सरपंच महादेव पाटील ,उपसरपंच मोहन शिकारे ,प्रा सदाशिव शिंदे ,बिराभाई शिंदे , गणेश गोडसे , विश्वजित गोरड, राजु गटकुळे,श्रीकांत गटकुळे यांनी गावच्या पिण्याच्या पाण्याची व्यथा मांडली , गावातील नागरीक पाण्यासाठी वनवन भटकत आहेत व पाणी समस्या पुढील 2 महिने सोडविण्याची विनंती केली , आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याची विनंती शिष्टमंडळाने केली , ईतर दिवशी लोक कुठुन पाणी आणणार , व 2 महिण्यात पाऊस येईल का असे बोलून मा चेअरमन राव सरानी दररोज पाऊस पडेपर्यंत पाणी घ्या असे सांगितले , यासाठी तात्काळ मंजुरी देऊन सिवील इंजिनियर श्री जमदाडे साहेब,मासाळ सो यांचे मार्गदर्शनाखाली काम करुन घेण्यास सांगितले , पाईप लाईन जोडणीसाठी युवा नेते बिराभाय शिंदे,सुदाम शिंदे,वस्ताद माने सर, काशिलींग ढवळे, संतोष शिंदे या ग्रामस्थांनी सहकार्य केले
त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून 2012 साली चेअरमन राव सर व व्हाईसचेअरमन बाळासाहेब कर्णवर यानी पिलीव कॕनल खाली गावच्या पाणीपुरवठा विहीरीसाठी 2 गुंठे जागा दिली आहे . तेथून पाणीपुरवठा पाईपलाईन करणेसाठी कारखाना चारी खोदण्यासाठी व ईतर अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करेल असे चेअरमन साहेबानी शिष्टमंडळला सांगितले , सदर प्रसंगी कारखान्याच्या संचालिका मा सौ उषाताई मारकड उपस्थित होत्या ,
तीव्र टंचाई असतानाही शासन प्रशासन यांनी पाणी विषयावर गांभीर्य दाखविले नाही , मात्र सदगुरु श्री श्री रविशंकर यांचे शिष्य उद्योगपती , सामाजिक बांधिलकी जपणारे मा राव सरानी बचेरी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता टंचाई काळात सोडवलेबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी चेअरमन मा राव सर व कारखान्याचे मनापासून आभार मानले आहेत .
गावच्या समस्या सोडविण्यात कारखाना प्रशासनाचे मोठे योगदान व सहकार्य आहे ,सदगुरु श्री श्री साखर कारखान्यामुळे बचेरीसह परिसरातील रस्ते व आर्थिक विकास झाला आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणा-या सदगुरु श्री श्री कारखान्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे .