त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
त-हाडी- प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे जंगलाचा र्हास होत चालला आहे. आज वाढत्या वृक्षतोडीमुळे वातावरणातील तापमानामध्ये वाढ झाली आहे. आपण जागतिक तापमानवाढीचे परीणाम भोगत आहोत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा म्हणू नका. केव्हा वादळ, वारा, अवकाळी पाऊस पडेल हे सांगता येत नाही. यावरूनच निसर्गाचा पुर्णपणे समतोल ढासळला आहे. चिन देशाने एक वर्ष पक्षांनी अन्नधान्य खाऊ नये यासाठी सर्व पक्षी मारण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे त्या देशाची इकोसिस्टम बिघडली. त्यामुळे निसगांशी छेडछाड करण्याचा फटका चिनला बसला. यातुन आपण आता सर्वांनी बोध घेतला पाहिजे. निसर्गातील सजीवसृष्टी किती महत्वाची आहे. पक्षी, प्राणी, हे निसर्गाचा समतोल राखत आहेत. पण त्यासाठी आता प्रत्येकाने घर तेथे झाड वातावरणातील बदलामुळे वादळी वारे, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्या करीता नागरिकांनी घर तेथे एक झाड लावावे अशे आवाहन देखील रावसाहेब चव्हाण मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.
दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालली आहे. नुसते झाड लावून उपयोगाचे नाही. तर ते जगविणे महत्वाचे आहे. जगात २९९६ प्राणी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या ठिकाणी झाडे आहेत अशा ठिकाणी संततधार यापैकी ८४प्राणी भारतामध्ये आहे. पाऊस पडत आहे. ज्या ठिकाणी झाडांचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी अतिवृष्टीला सामोरे जावे लागत आहे.गरजेचे आहे. आपण जागतिक तापमानवाढीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्यासाठी आपल्या जीवनात झाड खुप महत्वाचे आहे. एक एक झाड किती मोलाचे आहे. झाड अमुल्य आहे . एक झाड एका वर्षात १०० किलो पर्यंत ऑक्सिजन देते.. एका व्यक्तीस वर्षाला ७४० किलो ऑक्सिजनची गरज भासते. झाड एखाद्या भागाचे तापमान २ ते ५ अंशापर्यंत कमी करु शकते. साधारण वर्षभरासाठी एक झाड २२ किलो कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेते. एका झाडाच्या सहाय्याने वार्षिक ३५०० लिटर पाणी पाऊस पाडु शकतो. प्रत्येक झाड ३७०० लिटर पाणी जमीनीत पोहचवते.
यामुळे भुगर्भातील पाणी पातळी वाढते. घराच्या आजुबाजुला झाड लावल्याने एसीची गरज ३० टक्के कमी होते. यामुळे २० ते ३० टक्के विज बचत होते. शिवाय घरात येणारा गोंगाट ५० टक्केपर्यंत कमी होऊ शकतो. एक झाड ६ टक्क्यांपर्यंत धुर व धुके कमी करण्याचे काम करते. एक झाड ८० किलो कसदार व शेती करण्या योग्य होते. एका अभ्यासानुसार एक झाड लावल्याने पक्ष्यांच्या ८० पर्यंत प्रजाती आपण वाचवू शकतो.संकल्पना राबविली पाहिजे. पारा, लिथीयम, लेड विषारी धातू शोषून घेते. त्यामुळे मातीत्यामुळे प्रत्येकाने घर तेथे झाड लावणे गरजेचे आहे.
▪️”“पर्यावरणाचा समतोल राखणे
आज एक एक झाड खुप महत्वाचे आहे. आज निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने घर तेथे झाड संकल्पना राबविली पाहिजे. नुसते झाड लावून उपयोगाचे नाही तर ते जगविणे देखिल खुप महत्वाचे आहे.
फोटो -रावसाहेब चव्हाण मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते त-हाडी ता शिरपूर