त-हाडी वरुळ भटाणे, जवखेडा भामपुर, विखरण
परिसरात अवकाळी पाऊस ज्वारी,गव्हू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान
विमा कंपनीने पंचनामे करण्याचे निर्देश द्यावे
त-हाडी, दि.१७ (प्रतिनिधी) :- शिरपूर तालुक्यातील त-हाडी, वरुळ भटाणे, जवखेडा भामपुर विखरण, आदी गावांत दि.१५ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊसच्या सरी, तर काही ठिकाणी गारा पडल्या. या झालेल्या पाऊसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी कांदा पिके आणि फळपिके, भाजीपाला, फळधारणा केलेल्या आंब्याचे मोठे नुकसान होवून फटका बसला आहे. पिक विमा कंपनीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात यावे.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी ,वरुळ ,भटाणे, जवखेडा नवेलोढरे ,जुने लोढरे, त-हाडकसबे भटाणे, जळोद, ममाणे, अभानपुरसह , आदी भागात मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज सांगितला होता. दरम्यान वातावरण ढगाळ, सुर्य प्रकाश कमी दिवसभर होता. दि.१५ मार्च २०२३ रोजी आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन अचानक जोरदार वाऱ्यासह काही पाऊसच्या सरी पडल्या. तर काही ठिकाणी गारा पडल्या. सात ते आठ या दरम्यान वीजाच्या कडकडाट बरोबर जोरदार वाऱ्यासह काही पाऊसच्या सरी पडल्या. याचबरोबर मोठ्या आवाजात चमकणाऱ्या विजाचा कडकडाट सुरु होता. या अचानक झालेल्या पाऊस आणि गारामुळे नागरिक रब्बी हंगामातील गव्हू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पीकांचे नुकसान झाले तसेच फळपिके, भाजीपाला, मोहर केलेल्या आंब्याचे मोठे नुकसान होवून फटका बसणार आहे. केळी, पपई बागेचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होवून फटका बसणार आहे.असे शेतकरी तज्ज्ञ सांगत आहे. तरी विमा कंपनी आणि शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे काम करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली आहे.
——–चौकट
गेल्या वर्षी पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचं मोठं नुकसान झालं होतं. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वार्यावर सोडत आहे. सध्या परिसरात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतातील काढलेली गव्हू हरभरा फळपिके गारा आणि पाऊसाने खराब झाली असून मोठं नुकसान होत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून तातडीने मदत करण्यात यावी अशी मागणी त-हाडीचे लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर यांनी केली आहे.