फुकट नाही हो,
आयुष्यात सगळे सुख त्यागव्याची हिम्मत लागते तेव्हा
भेटते वर्दी
त-हाडी ता. शिरपूर घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलीला शिकवावे कसे आणि पोटाची खळगी भागवावी कशी असा प्रश्न ज्या कुटुंबाला एकेकाळी सतत पडलेला असायचा,ती परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत जिद्द,आणि चिकाटीच्या जोरावर त्याच कुटुंबातील मुलीने आज पोलिस कर्मचारी होऊन आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील अशोक मोतीराम अहिरे शासकीय आश्रमशाळा शिपाई व आई आशाबाई अशोक अहिरे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती बरोबर मजुरी करतात. मात्र यांचा मुलगी आरती अहिरे या तरुणीने मुंबई येथील पोलीस आयुक्तांलयाचे आस्थापणातील रिक्त असलेल्या २१६ पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यामध्ये शारीरिक चाचणी,मैदानी चाचणी त्याच बरोबर लेखी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.
या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आरती अहिरे ही एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी त्याचे प्राथमिक शिक्षण डाब आश्रमशाळेत सातपुडा विद्यालय लोणखेडा येथील माध्यमिक विद्यालय शाळेत इयत्ता नववी पर्यंत झाले. पुढे इयत्ता दहावीत मात्र पुढे शिकायची इच्छा असून परिस्थिती मुळे शिक्षण करायचे कसे व शिक्षणासाठी पैसा कुठून आणावा या विवंचनेतुन शिक्षणासाठी आई, वडिलांना मोलमजुरी कामात मदत केली. त्यानंतर काही दिवस काम करत रिकाम्या वेळात अभ्यास करून त्यानंतर शहादा तालुक्यातील लोणखेडा, पी,एस,जी व्ही, पी,एम, विद्यालयात येथे अकरावी,बारावीचे विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सांभाळून पोलीस भरतीची तयारी चालू ठेवली. आरती अहिरे सण २०२०/२१ वर्षी देखील मुंबई,पुणे,नाशिक येथे पोलीस भरतीत प्रयत्न केला होता. मात्र काही गुणांनी अपयशी ठरला, मात्र त्यानी जिद्द ठेवत आज पोलीस होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. व मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला.
डाब (अक्कलकुवा ) आश्रम शाळेत १ ते ३ पर्यंत चा होता. त्यानंतर वडिलांची बदली नंतर आम्ही सुलतानपुर या गावी राहू लागली तेथून मी लोणखेड़ा श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा येथे ४ ते १० वी पर्यंत शिक्षण झाले व काळ असतानाच मला खेळण्याची आवड निर्माण झाली.
१० वी ला नंतर पुढील शिक्षणाची वाटचालीसाठी लोणखेडा येथिल पी. एस जी. व्ही. पी. एम. लोणखेडा येथे ११ sci प्रवेश केला खेळण्याची आवड होती परंतु सोबत कोणी नाही या भितीने खेळा बदलाची आवड तेथेच सोडली व १२वी हे वर्ष महत्वाचे असून मी केवळ अभ्यास लक्ष दिले आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली पुढील वाढीसाची साठी प्रवेश त्याच कॉलेज बी.ए. B.A. या पदवीसाठी प्रवेश घेतला व माझा जीवनाचा खरा प्रवास सुरु झाला. माझ्यापेक्षा मोठी बहिण व भाऊ हे देखिल शिक्षण करत असल्याने घरात एकटे वडिल कर्ते असल्यामुळे घरात नेहमी आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागायचे तरी देखिल वडिलांनी कसलाही विचार न करता कसलीही कमी आम्हा भावंडास भासु दिली नाही वडिलांचे कष्ट नजरे सामोरे ठेऊन जिहीने, अभ्यासाला सुवात केली.
कॉलेज सुरू झाल्यानंतर कॉलेजात अनेक खेळ खेळले जात होते. इतरांना खेळताना पाहून परत एकादा खेळण्याची इच्छा जागृत झाली खेलाबद्दलची चौकशी करण्यासाठी, तेथील क्रीडा शिक्षक डॉ. अरविद कांबळे यांच्याकडे जाऊन चौकशी केली व खेळा बदल सरांनी सर्व माहिती सांगीतली व मी खेळल्यास सुरुवात केली तेथेच मला माझ्या सोबत खेळणा चांगल्या मैत्रीनी मिळाल्या. व २०१७ या वर्षी मी रोहतक (हरियाणा) या ठिकाणी बेसबॉल या स्पर्धासाठी निवड झाली सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळ खेळू लागली २०१८ या वर्षी माझी पुन्हा all India univarcity सॉफ्टबॉल या स्पर्धासाठी अमृतसर (पंजाब)येथे निवड झाली परंतु तेथे मला यश मिळाले नाही हार न मानता मी पुन्हा खेळण्यास
सुरुवात केली. २०१९ यावर्षी कॉलेज व खेळत असतांना पोलिस भरतीची जाहिरात पडली. व मी तो पोलिस भरतीय फॉर्म भरला व त्याच वर्षी माझी तलवारबाजी all India univarcity साठी चंदीगड (पंजाब) येथे या स्पर्धा पार पडल्या तिथे देखिल मला अपयश मिळाले. मी अपयश पचवून , पुढील सुरुवात केली अपयश सतत येत असल्यामुळे पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला व अभ्यासाला सुरुवात केली अभ्यास चांगला सुरु असतांना २०२० यावर्षी पोलिस भरती होणार असुन कोरोना या महामारी मुळे सर्वांच्या जीवनात अडचणी आल्या त्यामुळे सर्व काही २ वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले.
त्याच काळात मी पोलिस भरतीचा अभ्यास सतत चालू ठेवला कोरोनाचा काळ संपल्यानंतर पोलिस भरती होणार ही आनंदाची बाब महाराष्ट्र सरकारने जाहीर केली व १४ नोव्हेंबर २०२० रोजी मी माझा जीवनाचा पहिला पोलिस भरतीची पेपर दिला व मला तेथे अपयश आले व मी खचुन न जाता माझ्या अपयशाची कारणे शोधून त्यावर मात करत पुन्हा पोलिस भरतीचा अभ्यास शुरू केला ९ नोव्हेंबर २०२२ या वर्षी भरतीचा पुन्हा फार्म भरला ग्राऊड व अभ्यासाला सुरुवात केली. १४ फेब्रुवारी या दिवशी ग्राऊंडसाठी नायगाव येथे जाऊन ५० पैकी ४१ गुण घेऊन लेखी परिक्षेसाठी पात्र झाली आणि ७ मे २०२३ रोजी माझगाव मुंबई येथे भल्यामोठया शहरात मोठ्या ताईला घेऊन परीक्षा केंद्रावर पोहचली व २ ते ३.३० या दरम्यान पेपर सुरू असतांना मनात परिणाम काम असेल या भितीत पेपर दिला व रिझल्ट लागेपर्यंत मनात अनेक विचार येत होते किती गुण मिळतील, पास होणार की नाही व आई व वडिलांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही
{ चौकट साठी }
आई,वडिलांनी कष्ट माझ्या डोळ्यासमोर केलं आहे.परिस्थितीशी दोन हात करत आम्हाला शिकवून मोठं केलं तेच त्यांचे आयुष्य भरातील उपकार कधीही नविसरणारे आहेत.जिद्द ठेवल्यास परिस्थितीही हार मानते.हे मी आज समाजाला दाखवून दिले आहे.असे
आरती अहिरे- तरुणी त-हाडी