लग्नसराईची धूमधाम अन् वऱ्हाडी मंडळी घामाघूम
त-हाडी :- सध्या लग्नसराईचा धुमधडाका सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे व-हाडी मंडळींना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाचा पारा जोमाने वाढत असून, उन्हातान्हातून विवाहासाठी वन्हाडी मंडळी घामाघूम होत असल्याचे दिसत आहे. सध्या लग्नतिथी खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे एप्रिल महिन्यात व मे महिन्यात काही लग्न तिथी असून लग्नसराईला चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. सध्या एका गावात दिवसाकाठी दोन ते तीन विवाह होत आहेत. या विवाहासाठी पाणी आणण्याकरीता वधूकडील मंडळींची चांगलीच धावपळ होत आहे. काही मंडळींकडील वधूपित्याला पाणी विकत घ्यावे लागत आहे. लग्नतिथी असल्याने वधू-वराकडील मंडळी वधू-वरांसाठी बाजारपेठेत कपडे, भांडे व सोने खरेदी करण्याकरीता मोठी गर्दी करीत असल्याने कपड्याचे, भांड्याचे व सोन्याचे दुकाने हाऊसफुल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. मात्र, वाढत्या तापमानामुळे वऱ्हाडी मंडळीची दमछाक देखील होत असल्याचे दिसत आहे.
चौकट:-डी. जे. ने हरपला बँडबाजा
लग्नसराई म्हटलं की जिथ तिथं सनई, चौघडा त्यानंतर बँडबाजा, तडमताशा, ढोलीबाजा आदी वाद्यांची धूम. परंतु, सध्या या सर्व वाद्यावर डी.जे.ने कुरघोडी केल्याचे चित्र दिसत आहे. जिथे डि.जे. नसतो तिथे मात्र ढोलीबाजा आपले स्थान टिकवून आहे. परंतु, ढोलीबाजापेक्षाही डी.जे.च्याच तालावर नाचण्यासाठी आजची पिढी जास्त भर देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी हळद लावल्यानंतर ते वऱ्हाडाच्या जाण्यापर्यंत सनईचा सूर ऐकावयास मिळत होता. त्यानंतर बँडने ती जागा घेतली. त्यानंतर ढोलीबाजाने त्याची जागा घेतली आणि आता ती जागा डी.जे. घेऊ लागला आहे.
चौकट:-दारू असेल तर नाचू
सध्या लग्नसराईचा जोर वाढल्याचे दिसत असतांना दिवसाकाठी एका गावात दोन ते तीन विवाह होत असल्याचे दिसत आहेत. या विवाहांमध्ये परण्याच्या वेळेला नाचण्याकरीता दारू असेल तरच नाचू असा हट्ट वराकडील मित्रमंडळी करत असल्याचे दिसत आहेत.