तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली
माहूर तालुका प्रतिनीधी राजीक शेख
माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. माहूर तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताजनक झाला आहे. तर काही दिवसा पूर्वी पाऊस आला असल्याने नागरिकांनी पेरणीला सुरुवात केली होती. काही नागरिकांनी पेरणी केली असता पावसाने मागील काही दिवसांपूर्वी जोरात हजेरी लावली होती.पण त्या जोरदार पाण्याने कापूस लावले ल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कारण जोरदार पावसाने कापसाचे बी मातीतच दडपले आहे.आणि आत्ता नागरिकांनी पेरणी तर केली आहे पण पावसाचा पत्ता नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी चिंताजनक झाला आहे.
मांगच्या वर्षी ही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी झेलाव्या लागल्या. गेल्या वर्षी सोयाबीन, कापूस ,तूर ,उडीद ,मूग ज्वारी ,गहू ह्या कोणत्याही पिकांमध्ये मुनाफा झाला नसल्याने शेतकरी गेल्या वर्षीही चिंताजनक होता आणि यावर्षी पाऊस असं करत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या दोन चार दिवसात पाऊस झाला नाही तर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना डबल पेरणी करण्याची वेळ येऊ शकते.