रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन दहिवडी तर्फे रविवारी माणदेशी कवी संमेलन
म्हसवड:
दहिवडी (ता.माण) विविध सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन च्या वतीने रविवारी दि. 7 रोजी सार्वजनिक
जीवनामध्ये विविध विषयावर निरपेक्ष काम करणाऱ्या हस्तीचा सन्मान व सत्कार समारंभ असून माणदेशी ग्रामीण कवी संमेलन (साहित्य कट्टा) कार्यक्रम आयोजित केला आहे माणदेशी मातीतील कवी ,नवकवी यांना या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध केले असून प्रसिध्दी पासून कोसो दूर असणाऱ्या समाजातील व्यक्तीमत्वांचा सन्मान सत्कार संस्थेच्या वतीने गौरवण्यात येणार आहे
रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व दहिवडी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ७ मे रोजी सकाळी ९.३० वाजले सुरू करण्यात येणार आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी
कृषी सचिव
रयत संस्थेचे कौंसिल सदस्य प्रभाकर देशमुख साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे
रामकृष्ण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मारुती काटकर हे स्वागताध्यक्ष आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कृष्णा इंगोले आहेत.
या संमेलनात सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत परिसंवाद ‘माणदेशाचे प्रश्न आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. मायणी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सयाजीराव मोकाशी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या परिसंवादात सुभाष कवडे, डॉ. मिरा देठे , शिवाजी बंडगर,
सहभागी होणार आहेत. दुपारी १२ ते १ या वेळेत वडूज येथील प्रा. सुहास पवार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. यावेळी प्रा सर्जेराव खरात
हिरालाल जाधव, जोतिराम फडतरे, यांचे कथाकथन होणार आहे. त्यानंतर माणदेशी निमंत्रित कवी संमेलन होणार आहे. यामध्ये प्रा. सुहास पवार, ऋतुजा पाटील,स्नेहल शिंदे , पानवन,बाबासाहेब कोकरे, ज्ञानेश डोंगरे, शिवाजी सातपुते, प्रा. प्रभाकर पवार, किरण जाधव, महादेव भोकरे व इतर कविंचे कविता वाचन होणार आहे. यावेळी डॉ. अभिजीत सोनवणे, अश्विनी वेताळ, डॉ. दिपक हिंडे, रवी बोडके, धनवान देशमुख ,सविता खांडेकर यांचा विशेष सन्मान होणार आहे.
ऍड. बी. एम. जाधव (मुंबई/लंडन), अजय देशमुख, अजित कांबळे, संतोष महाडेश्वर, शशिकांत सोनवणे, जयंत लंगडे,उमेश भापकर, अजित देशमुख, शिवाजी महानवगर, विजय जाधव आदिंसह खटाव- माण तालुक्यात माध्यमिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तरी दहिवडी कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमास साहित्यीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा जयराम शिंदे, प्रा सुहास पवार , प्रा मिरा देठे, व दहिवडी कॉलेज दहिवडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.