माणदेशी कवी संमेलन मातीला सुंगध देऊन गेले : डॉ कृष्णा इंगोले
दहिवडी प्रतिनिधी :
माण देश च्या मातीने सर्वात मोठे कवी ,शाहीर , लेखक ,साहित्यकार कलाकार दिलेले आहेत त्याच मातीत दहिवडी येथे अनेक कवींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाऊन कार्यक्रमास चार चांद लावले होते
कवीच्या जीवनामध्ये ठिणगी पडते त्यात कवितेंचा वणवा पेटतो तीच कविता लोकमान्यता मिळऊन समाजातील कवी जिवंत राहतो असे मत प्रा जयराम शिंदे व्यक्त केले
तर कवीच्या मनात सतत कवितेचा ध्यास असतो म्हणूनच सुंदर सुंदर कवितेचा जन्म होतो अश्याच कवींतांची
मैफिल व आस्वाद माणदेशी कवी संमेलनात पहावयास मिळाला
नवकवी ना एक व्यास पीठ व त्यांच्या समाजाप्रती प्रश्न वेदना या काव्य संमेलनातून दिसून येतात असे मत डॉ मारूती काटकर यांनी व्यक्त केले कवी बाबासाहेब कोकरे यांनी शब्दांना गुंफून कविता लोकांच्या मनात कसे राज्य करते ते कवितेतून सुंदर वर्णन करून कार्यक्रमास सुरवात केली
राम कृष्ण फाउंडेशन व दहिवडी कॉलेज दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माणदेशी साहित्य संमेलन साहित्य कट्टा या कार्यक्रमाचे उद्घाटन हर्षदा ताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्राचार्यकृष्णा इंगोले सर हे होते यांनी मान व खटाव तालुक्यातील सर्व साहित्यिकांच्या विषयी माहिती सांगून मान खटाव तालुका हा दुष्काळी भाग असला तरी इथे माणुसकीचा व बुद्धिवान माणसांचा सुकाळ आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले ग्रामीण भागातील साहित्यिकांना असे साहित्यक व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही खऱ्या अर्थाने गौरवाची बाब आहे विशेष असे साहित्य सेवा पुरस्कार आणि समाजसेवा पुरस्कारामुळे यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्सव निर्माण होणार आहे
परिसंवादाचा विषय होता मान देशाचे प्रश्न “शब्दाची
पूजा करत नाही माणसासाठी आरती करतो ज्याच्या गावी सुर्य नाही त्यांच्या हाती उजेड देतो मान मध्ये दुष्काळ असला तरी बुद्धिचा सुकाळ आहे .प्रचार्य सभाष कवडे सर यांनी उद्गार काढले या काव्य संमेलनासाठी महराष्ट्रातील विवीध भागातुन कवीं, गझलकार , नवकवी यांनी
सहभाग घेतला सर्व कवी आणि कवियत्री यांना साहित्य सेवा पुरस्काराने गैरविन्यात आले.
भिक्षू कर्यांचे डॉक्टर म्हणून देशात प्रसिद्ध असणारे सत्करमुर्ती डॉ अभिजीत सोनवने,यांचा सन्मान माण भूमी वरती करण्यात आला
कराड येथील सामाजिक , निराधार आश्रम चालवणाऱ्या
अश्विनी वेता ळ यांचा ही विशेष सन्मान व सत्कार करून पुढील कामासाठी शुभेच्या देण्यात आल्या
यशोधन ट्रस्ट चे चालक
,रवी बोडके, यांनी आतापर्यंत हजारो बेघर लोकांना निवारा दिला आहे या अवलियाचा सन्मान करून प्रोहस्थान देण्यात आले
ज्याला कोणी नाही अश्या असहाय वयस्कर लोकांना धान्य , घरगुती वस्तू स्वरूपात मदत करण्यात
सविता खांडेकर तर
माण च्या माळावर सह्याद्री देवराई च्या माध्यमातून लाखो झाडे लाऊन हिरवाई फुल वणाऱ्या
,योगेश गायकवाड यांचा सन्मान करून त्यांना पुढील कामासाठी ऊर्जा देण्याचं काम करण्यात आले
बारामती येथील
,धनवान देशमुख यांना समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातून,वेगवेगळ्या विभागातून , या व्यासपीठाला रंगविण्यासाठी,फुलवण्यासाठी आपल्या भाषेची , आवाजाची, मातीची , कतृत्वची,विचाराची , योगदानाची , लय घेऊन कवी माणदेशी कवी संमेलनात सहभागी झाले होते
माणदेशी साहित्याचा इतिहास व वणवा हा राज्यभर असून त्यावर डॉ काटकर यांची कविता सर्वांचं मन वेधून गेली यावेळी ज्ञानेश डोंगरे, शेलशा कारंडे,किरण जाधव,कांताताई भोसले,
शिवाजी सातपुते, प्रभाकर पवार, महादेव भोकरे ,शाहीर भीमराव कदम, कवी मोहसीन आतार,शुभदा कुलकर्णी, मिलींदा पवार, रविना यादव, अनुराधा गुरव , विनया तिडके, सीमा मंगरुळे, जयंत लंगडे यांनी उपस्थिती लावली होती
या कार्यक्रमासाठी विशेष योगदान डॉ. मारुती काटकर,प्राध्यापक सुहास पवार,सौ मिरा देठे ,उमेश भापकर,पत्रकार ,लेखक जयराम शिंदे,प्रताप काटकर,दहिवडी कॉलेजचा प्राचार्य एस टी साळुंखे,अक्षय काटकर,आनंद काटकर,शशिकांत सोनवने यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
फोटो- छायाचीत्र – जयराम शिंदे –
अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ कृष्णा इंगोले सर इंस्टिट्यूट डायरेक्टर हर्षदा जाधव, सौ मिरा देठे जयराम शिंदे , डॉ काटकर , सुहास पवार सोबत प्राचार्य मोकाशी व इतर