जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरानी महाराष्ट्राच्या विविध भागात जिवितहानीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या संकटाने लोकांच्या अनेक मूलभूत सोयी-सुविधाही हिसकावून घेतल्या आहेत. याच संकटाने कोसळलेल्या विजेच्या त्रासामुळे गेल्या कित्येक दिवसापासून अंधारात राहत असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासीपाड्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस व सुप्रयास फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ.सुमन अग्रवाल यांनी लोकांना सौर दिवे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक-उद्योजक रामप्रकाश अग्रवाल, पूजा पोद्दार यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्ते उपस्थित होते.