“मेहरा साहाब, आपने तो हमें भगवान राम बना दिया’उमेश काशीकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचा आज (2 Dec) स्मृतिदिन. अंतुले यांच्या संदर्भात एक आठवण महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एअर चीफ मार्शल ओ पी मेहरा यांनी सांगितली होती व ती आठवण त्यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात ‘Memories : Sweet and Sour” देखील नमूद केली आहे.
अंतुले यांना हटवण्यात राज्यपाल मेहरा यांची देखील भूमिका महत्वाची होती हे त्यांच्या चरित्रातून दिसून येते. अंतुले पायउतार झाल्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८२ साली मेहरा यांची देखील महाराष्ट्रातून उचलबांगडी केली होती व त्यांना राजस्थान येथे राज्यपाल पदावर पाठवले होते. ओ पी मेहरा लिहितात: “अंतुले यांच्याशी माझे कोणतेही वैर नव्हते. अनेक वर्षांनंतर दिल्ली आमची भेट झाली, तेव्हा त्यांनी एक अतिशय रंजक विधान केले होते.
श्री अंतुले यांची नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात मी त्यांना भेटलो आणि केंद्र सरकारमध्ये आरोग्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
त्यावर त्यांनी उपहासात्मक स्वरात टिप्पणी केली, “धन्यवाद. खरं तर, मला प्रभू श्रीराम बनवण्यात तुमचाच मोठा वाटा आहे.”त्यावर मी विचारले, “याचा अर्थ काय?”त्यावर अंतुले म्हणाले, “रामाला १४ वर्षांचा वनवास झाला होता, आणि तुम्हीही मला १४ वर्षांचा वनवास दिला”







