इंग्रजा विरुध्द बंड उभारून देशासाठी फासावर जाणारे पहिले क्रांतिवीर उमाजी नाईक : अभय जगताप
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
एकोणिसाव्या शतकात आपपासातील हेव्यादाव्यातून मराठा साम्राज्यास उतरती कळा लागली होती. त्यातून मराठा साम्राज्याचा अस्त झाला होता . त्याचवेळी इंग्रजांनी हिंदुस्थानात आपला जम बसविण्यास प्रारंभ केला. त्यावेळी इंग्रजा विरुद्ध अनेक उठाव झाले . इंग्रज सत्ते विरुद्ध बंड पुकारून त्यांना शह देणारे आणि फासावर जाणारे पहिले क्रांतीवीर उमाजी नाईक ठरले आहेत. असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी क्रांंतीवीर उमाजी नाईक यांच्या जंयती कार्यक्रमात व्यक्त केले .
म्हसवड ता.माण येथील आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक तरुण मंडळाने आयोजित केलेल्या क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 230 व्या जंयती निमित्ताने ते बोलत होते. याप्रसंगी आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन अभय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब काळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पथ्वीराज राजेमाने , भाजप व्यापारी शहराध्यक्ष परेश व्होरा , अध्यक्ष नेताजी चव्हाण , उपाध्यक्ष नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप पुढे बोलताना म्हणाले इंग्रजांनी हिंदुस्थानात अत्यंत जुलम , अत्याचार सुरू केले. इंग्रजी राजवटी विरुद्ध सर्वप्रथम रामोशी समाजाने बंड पुकारले. इंग्रजी राजसत्ता उलथून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केले. या बंडात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे योगदान व नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचे बंड वर्षोनुवर्षे प्रेरणा देत राहील. रामोशी सामाजातील तरुण आजच्या घडीला स्वतःचा व्यवसाय सूरु करून स्वत:च छत्रपती व्हावे असाही सल्ला उपस्थित तरूणांन जगताप यांनी दिला आहे.
यावेळी महाबळेश्वरवाडी चे माजी सरपंच विजय जगताप , बाळासाहेब आटपाडकर , शिरतावचे उपसरपंच किरण खवळे , बाबूराव बोडरे , लहुराज चव्हाण , काकासो जाधव , खजिनदार करण जाधव , सदस्य रवि जाधव , बयाजी जाधव , गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
म्हसवड :- येथे क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना अभय जगताप , सोबत पथ्वीराज राजेमाने , बाळासाहेब काळेल , विजय जगताप , अध्यक्ष नेताजी चव्हाण , लहुराज जाधव व इतर मान्यवर ( छाया :- बापूसाहेब मिसाळ )