कांद्याच्या अल्प दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
५ ते ६ रुपयांवर आला कांदा: उत्पादन खर्चही निघेना
त-हाडी
सध्या नवीन कांदा बाजारात आलेला आहे. कांद्याची आवक वाढल्याने दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला प्रतिकिलो अवघा ५ ते ६रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चन निघणेही अवघड झाले आहे. कांद्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
तालुक्यातील त-हाडीसह परिसरात अनेक शेतकरी कांदा व इतर भाजीपालावर्गीय पीके घेत आहेत.लाल कांद्याचे उत्पादन यंदा चांगलेच वाढले आहे. बाजारात कांद्याची आवक वाढल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. एकीकडे कांदा उत्पादन वाढलेले असताना दुसरीकडे सध्याच्या बाजारभावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च फिटणे देखील दुरापास्त झाले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी अल्पदराने केली जात असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.अल्प दरामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली. जात आहे.परंतु आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विक्री करावा लागत आहे.
….कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले,
शेतकऱ्यांनी महागड्या दराने कांद्याची रोपे घेऊन कांद्याची लागवड पूर्ण केली आहे. यंदा कांदा लागवडीला मजूर वर्गाची देखील तुटवडा भासल्याने कांदा लागवडीचा दर प्रतिएकर १५ते १७ हजार रुपयांच्या पुढे गेला होता. दरम्यान, कांदा लागवड झाल्यापासून प्रत्येक महिन्याला वातावरणात बदल झाल्याने कांदा पिकाला फटका बसला आहे. सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आणि महागड्या दराने कांद्यावर औषधाची फवारणी करून कांदे जगविले आहेत; परंतु योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.
धनराज कंरके _कांदा उत्पादक शेतकरी त-हाडी