श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
राजकारणी व सनदी अधिकारी यांच्या अभद्र युतीच्या जोरावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या विभागात असणारे डान्सबार, पब, स्पाच्या नावाखाली चालणारे अनाधिकृत वेश्या व्यवसाय आणि या अवैध धंदे वाल्यांच्या 100 कोटी वसुलीचे जनक अजून ही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत परंतु याचे देणे घेणे व पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या यंत्रणेला काहीच फरक पडत नाही !!!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई.
श्री.दिलीप वळसे पाटील, मा. गृह मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई.
श्री.शरदचंद्र जी पवार, मा. खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
श्री. संजय राऊत, (पत्रकार) मा.खासदार शिवसेना पक्ष मुंबई.
आणि माझे मुंबई पोलीस दल प्रमुख तसेच अति वरिष्ठ सनदी अधिकारी व विविध पदांवरील मपोसे पोलीस अधिकारी मुंबई यांना जय हिंद !!
वरील सर्व आदरणीय मा. लोकप्रतिनिधी, मा. मंत्री महोदय, व माझे भारतीय पोलीस सेवेतील आदरणीय वरिष्ठ मी सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (24004)मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई आपल्या सर्वांना एक माझ्या मनातील शंका व अडचण विचारत आहे की “आपल्या महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभार, बेकायदेशीर कामकाज या बाबत आवाज उठवणे योग्य की अयोग्य ? या बाबत आपण मा. मंत्री, लोकप्रतिनिधी, तसेच पोलीस दल प्रमुख या सर्वांनीच मला योग्य मार्गदर्शन करावे ही हात जोडून नम्र विनंती आहे.
ज्या करता लोक प्रतिनिधी म्हणून गोरगरीब जनतेने आपल्याला निवडून दिले असे लोकप्रतिनिधी व ज्या देश सेवे करता मी, माझे सनदी अधिकारी यांनी खाकी वर्दी स्वमर्जीने अंगावर परिधान केली ती परिधान करताना खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ज्या आना भाका शपथा घेतल्या त्या प्रत्येक आना भाका शपथा यातील प्रत्येक शब्दांच्या अर्थ पूर्ण वाक्याना आपण सर्वजण योग्य न्याय देण्याचे देश सेवेचे एकनिष्ठ कायदेशीर काम करत आहात का ?अर्थात असे भ्रष्टाचार बेकायदेशीर काम करणारे, गुन्हेगारी जगताशी संबंध ठेऊन स्वतःचा आर्थिक विकास करणाऱ्या भ्रष्टाचार कारभारातील लिप्त असणारे सनदी अधिकारी व इतर पदांवरील विविध अधिकारी/कर्मचारी यांची संख्या अत्यंत अल्प आहे पण या सर्व कार्यप्रणालीत राजकीय लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलातील ठराविक सनदी अधिकारी व त्यांच्या चेल्याच्या अभद्र युतीने मात्र माझ्याच पोलीस दलातील प्रामाणिक, इमानदार सनदी अधिकारी, विविध पदांवरील पोलीस अधिकारी/अंमलदार यांची ससेहोलपट कुचंबणा, मानसिक छळ सतत होत आहेच ? इत्यादी अमानवी जाचा तुन त्यांची मुक्तता कधी ?
मुंबईतील डान्सबार, पब, स्पा, विविध अवैध धंदे यांना बेकायदेशीर अभय देणारे काही ठराविक पोलीस अधिकारी यांच्या वर योग्य कारवाई न करता तक्रारदार यांचा काटा कायमस्वरूपी काढून पोलीस दलातील भ्रष्टाचार कारभाराला खत पाणी घालून भ्रष्टाचार पूरक व्यवसाय करणाऱ्या आपल्या सर्वना काय म्हणावे ? हेच समजत नाही ?
आज या माध्यमातून हे सर्व लिहिताना व्यक्त होताना मात्र कुठं तरी नक्कीच मनाला दुःख होत आहे की पोलीस दलातील 37 वर्ष प्रामाणिक इमानदारीने कर्तव्य बजावताना व याच व्यवस्थेतील भ्रष्टाचार कारभारात मे उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे स्व खर्चाने जनहितार्थ दाद मागताना जी आयुष्याची राख रांगोळी आपण सर्वांनी मिळून केली ? त्याचआपल्या सर्वांच्या मानसिक छळातून, शारीरिक आजारपण वाढवून मरणासन्न अवस्थेकडे एकाकी मार्ग क्रमन करताना होणाऱ्या वेदना इत्यादी गोष्टी चा विचार करता खूप काही अत्याचार वरील नमूद आपण शासन व पोलीस दल यांनी केल्याचे विदारक सत्य आठवताना असे वाटते की येथील ही व्यवस्था, लोकप्रतिनिधी व माझे पोलीस दल हे नक्कीच सत्याच्या बाजूने नसून फक्त भ्रष्टाचार, मनमानी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांच्या करताच उभे असून अशी व्यवस्था या सर्वांनी मिळून उभी केलेली आहे.
हे आरोप करत असताना मनाला अतीव दुःख ही तितकंच होत आहे की दिनांक 24/02/2020 रोजी केलेल्या स्वरूप डान्सबार, व्ही. पी. रोड पोलीस ठाणे मुंबई या आस्थापना यावर काल कारवाई करण्यात आली जर ही कारवाई त्याच वेळी करण्यात आली असती तर 100 कोटीच्या वसुली कांडा गँग ऑफ वाजे पूर यांची भ्रष्टाचार कार्यप्रणाली, गुन्हेगारी कृत्य खंडण्या, खून दहशत वादी काळे कारनामे कदाचित बाहेरच आले नसते ?
मुबंई पुणे शहरातील वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभार सण 2016,2017 या काळात मी उघड करून मे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जे योग्य पोलीस दलातील विदारक भ्रष्टाचार प्रकरण उघड केलं त्यावेळी ही महाराष्ट्र राज्य शासन भाजपा व शिवसेना युतीचे माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्वतः व त्यांच्या सरकारने व माझ्या पोलीस दलातील प्रत्येक पदांवरील सनदी अधिकारी व त्यांच्या हस्तकांनी माझा कायमचा काटा काढण्याचे अनेक बेकायदेशीर कट कारस्थान करण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.
वरील सर्व बाबींचा, भ्रष्टाचार कारभाराचा विचार करता आजही मुंबईतील अवैध धंदे, डान्सबार, पब, स्पा इत्यादी सर्व गैर प्रकार खुले आम चालू आहेत हे सर्व आज या करता लिहीत आहे की मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस दल यांच्या कार्यालयात काही समाज कंटक अवैध धंदे वाले हे त्यांच्या अवैध धंदे पब, डान्सबार इत्यादी आस्थापना विहित वेळे पेक्षा जास्त काळ चालू राहण्या करता मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस दल यांच्या कार्यालयात दिवसभर ठाण मांडून होते अर्थात त्यांच्या मुख्य कलाकारांचा फोटो माझ्या कडे उपलब्ध आहेच.
आता हे समजत नाही की मुंबई पोलीस दलाची गँग ऑफ वाजे पूर प्रकरणांत इतकी प्रतिमा मलिन होऊन सुद्धा मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील तो दुसरा सचिन वाजे गँग ऑफ वाजे पूर कंपनी प्रमुख कोण ? कोण आहे मा.पोलीस आयुक्तांच्या नावाला कलंक लावू पहाणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? जे कोणी अवैध धंदे वाले मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालयात दिनांक 07/09/2021 रोजी किती वेळा आले गेले याचे सीसी टीव्ही पडताळणी व लेखी नोंद रजिस्टरमध्ये नक्की नोंद करून आले गेले याची पडताळणी केल्यास नक्कीच सत्य बाहेर येऊन मा पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व इतर सनदी अधिकारी यांच्या बदनामीस कारणीभूत आहेत त्यांचे वस्त्रहरण नक्कीच होईल नाही झाले तर मी पुराव्या सह नक्कीच करीन पण त्या करता मा.पोलीस आयुक्त श्री हेमंत नगराळे जी यांची इच्छा शक्ती महत्वाची आहे असो सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुनिक मुंबई नमूद दिवसाचे सीसी टीव्ही व रजिस्टरमध्ये काही मानवी छेड खाणी होऊ नये किंवा तसे कोणी करू हीच विनंती अर्थात तसं झालं व केलं तरी योग्य पुरावे नक्कीच उपलब्ध आहे माझ्याकडे !! जय हिंद !! भ्रष्टाचार मुक्त पोलीस दल व्हावे हीच सदिच्छा !!
श्री सुनिल टाेके याच्या मताशी श्री जगदीश काशीकर सहमत आहेत कारण तेही अशा अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुर्घटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेळ आली आहे !! कालच दिनांक सात सप्टेम्बर, 2021 ला त्यानी या संदर्भात आपली समस्या भारतीय जनता पार्टीचे नेते व अध्यक्श श्री चंद्रकातदादा पाटील यांना मुंबई येथील नरीमन पॉईन्ट येथील कार्यालयात भेटुन आपली समस्या सांगितली.