केवल विकमनी यांची व्यथा व मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
अंबरनाथ: मी केवल विकमनी वय-२६ वर्ष. मी अंबरनाथ जि.ठाणे येथील चिकलोली गावात क्रिकेट फुटबॉल मैदान टर्फ चालवत होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन अंबरनाथ येथील पी.एस.आय. सुहास विटल पाटील यांनी मला टर्फ चालवण्यासाठी वारंवार हफ्ता देण्यास त्रास दिले व ५००००/- इतकी रकम हफ्ता वसूल केला. त्यानंतर मी त्यांना पैसे दिले नाही व मी हफ्ता देण्यास नकार दिला म्हणूनच त्यांनी मला शिवीगाळ, लाथा काठ्या बुक्कयांनी मारहाण केली. अश्लील भाषेत शिवीगाळ करून, रात्री क्रिकेट खेळण्यास आलेले खेळाडू व मला २००-३०० उठाबशा काढायला लावल्या व सीसीटिव्ही कॅमेरे ही बंद करण्यास सांगितले. परंतु मी चलाखीने ते बंद न करता यांची व यांच्यासोबत आलेले काही भागीदार , साथीदार या सर्वांची व्हीडिओ काढून ठेवली नंतर मी वारंवार तक्रार करूनही यांच्यावर कोणीच काहीच कार्यवाही केली नाही. गेल्या मे-२०२३ पासून मी वारंवार तक्रारी व अर्ज करूनही कोणीच दादही देत नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना वारंवार भेटूनही कार्यवाही करण्यास विनंती केली परंतु आरोपी व तिकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे मित्र असल्याने त्यांनी आरोपीला वाचवण्याचे काम केले व माझ्यावर वारंवार अन्याय करून माझं आर्थिक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण केला आहे.
या सर्वांनी मिळून सरकारी पदाचे दुरुपयोग केले व त्यानंतरही वारंवार मला त्रास देऊन सदरचे व्यवसाय मला बंद करण्यास भाग पाडले असून मी बेरोजगार झालो आहे. व सदरच्या उत्पन्नातून माझ्या उदरनिर्वाह चालू होता परंतु या अधिकाऱ्यानं मुळे माझं आर्थिक नुकसानही झाले असून मी कर्जबाजारी झालो आहे.
नवतरुण पिढी जे देशाचं येणार भविष्य आहे त्यांनी हफ्ता / लाच दिल्या शिवाय कुठलाही व्यवसाय करू नये व तरुण , नवीन व्यावसायिक आहोत आम्ही काही छोटा अधिकृत व्यवसाय करत असलो तर येऊन मारहाण , शिवीगाळ केली व तरुण पिढी १५-२० मुलांना २००-३०० उठाबशा काढायला लावल्या , परंतु उद्या यांच्यामुळेच माझ्यासारखे दुसऱ्या कोणाचे आयुष्य खराब झाले तर मानसिक त्रासामुळे चरस, गांजा, ड्रॅग्स, दारू असे व्यसन करून तरुण पिढी चा भविष्य बरबाद होईल यांच्या अश्या कृत्यामुळे.
पोलिसांनी नागरिकांना मारहाण,शिवीगाळ, उठाबशा काढायला लावणे हे अधिकार त्यांना दिलेत का ??? नागरिकांसोबत अशी वागणूक करण्यासाठी यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री महोदय / ठाणे पोलीस आयुक्त महोदय यांनी आदेश दिलेत का ??? हफ्तवसुली करण्याचे आदेश यांना कोणी दिले आहेत ??? जर हे लोकांना जागेवरच शिक्षा देत आहेत तर न्यायालय कश्यासाठी आहेत ???
सदर घटनेचे व्हीडिओ ऑडिओ पुरावे मी आपल्यासोबत शेअर करत आहे. त्यांनी आपली व्यथा फेसबुक द्वारे मांडली आहे.