आटपाडी तालुक्यात शेळ्या मेंढ्या व विहिरीवरील विद्युत पंपाच्या चोरीचे प्रमाण वाढले
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये शेळ्या मेंढ्या व विहिरीवरील विद्युत पंप चोरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरसुंडी येथील मदन जावीर यांच्या विहिरीवरील विद्युत पंप चोरीला गेला होता. त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर घानंद तलावातील पाच ते सहा विद्युत पंप व वलवण येथील शेतकऱ्यांचे चोरून नेले होते.
त्यानंतर विभूतवाडीतील अर्जुन मोटे यांच्या सर्वच शेळ्या चोरट्याने रातोरात लंपास केल्या होत्या. त्यानंतर आटपाडीतील शेजारच्या वस्तीवरील मेंढ्या चोरीची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झाली. लगेचच दुसऱ्या दिवशी कुरुंदवाडी येथील विहिरीवरील दोन विद्युत पंप चोरीला गेले. तर आज झरे येथील तुकाराम पाटील यांच्या शेळ्या चारा खात असताना दिवसाढवळ्या शेळ्या चोरून नेल्या .
एकतर शेतकरी दुष्काळाने पिचला आहे. शेतीला पाणी नाहीm जनारांना पाणी प्यायला नाही. कशीबशी जनावरे जगवत आहेत .व काही शेतकऱ्यांनी विहिरीला पाणी नाही. म्हणून मोकळे फिरणे बंद केले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा डोळा चुकवून शेळ्या मेंढ्यांच्या चोरीचे प्रमाण वाढलेआहे. तसेच विहिरीवरील विद्युत पंप चोरीचे प्रमाण वाढले आहे.
त्याचबरोबर गाव डीपी तील फुज चोरीचे प्रमाण वाढले आहे. या सर्व चोरींचे पंचनामे होतात पोलीस अधिकारी येऊन घटनास्थळी भेट देतात परंतु अद्याप चोरटे फरारच आहेत अद्याप एकही चोर सापडला नाही.
तरी पोलिसांनी चोरट्यांचां तपास लावावा व गोरगरीब शेतकऱ्यांचे विद्युत पंप व शेळ्या मेंढ्या चोरीला गेलेल्या त्या शेतकऱ्यांना परत मिळवून द्याव्यात अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
यापूर्वी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्याकडे कार्यभार होता. त्यांची बदली झाल्यानंतर प्रकाश गायकवाड म्हणून पोलीस निरीक्षक यांनी चार्ज घेतला आहे.नूतन पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड हे चोरीस गेलेले शेळ्या मेंढ्या व विद्युत पंप याचा छडा लावून त्या शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.