स्व. अनिलभाऊ बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेली कामे मंजुर….
आटपाडी व घोटीचे ग्रामस्थ झाले भावनिक
सुहास बाबर यांच्याकडे व्यक्त केले कृतज्ञतापूर्वक समाधान
प्रतिनिधी आटपाडी
महाराष्ट्रातील एक अत्यंत कार्यतत्पर आमदार म्हणून ओळख असणाऱ्या स्व .अनिल बाबर यांनी त्यांच्या अखेरपर्यंत जनतेच्या कामासाठी आयुष्य वेचले त्याचीच परिणीती म्हणून अगदी आमदार बाबर यांच्या निधनापूर्वी पाठपुरावा केलेल्या आटपाडी व घोटी खु. या गावातील महत्त्वपूर्ण दोन कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेली कामे म्हणजे एक प्रकारे स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना श्रद्धांजलीच असल्याची भावना या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या दोन्ही कामांना तब्बल दोन कोटी 25 लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे .अखेरच्या क्षणी आमदार अनिल भाऊंनी प्रयत्न करून मंजूर केलेल्या या कामामुळे भावनिक झालेल्या नागरिकांनी युवक नेते सुहास बाबर यांच्याकडे अत्यंत कृतज्ञतापूर्व समाधान व्यक्त केले.
आटपाडी येथील बाजारपटांगणातील शुक्र ओढ्याच्या पात्रालगत पुरसंरक्षक भिंत बांधण्यात यावी यासाठी नेते तानाजीराव पाटील व स्थानिक लोकांनी तसेच तेथील आसपासच्या व्यापाऱ्यांनी आमदार अनिलभाऊ यांच्याकडे मागणी केली होती ही बाब लक्षात घेऊन आमदार अनिलभाऊ बाबर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये ओढ्यालगत पुरसंरक्षक भिंत बांधणे साठी निधीची मागणी केली होती
यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले की आटपाडी मुख्य बाजारपेठे लगत ओढ्याचे पात्र आहे व मोठा पाऊस झाला की त्या ओढापात्राचे पाणी पात्राच्या बाहेर येऊन लोकांच्या दुकानात जाते व त्यातून व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते
त्यामुळे मा तानाजी पाटील व सर्व व्यापाऱ्यांनी आमदार अनिल भाऊ यांची भेट घेऊन होत असणाऱ्या अडचणी बद्दल सांगितले होते.
त्यावर मार्ग काढण्यासाठी अनिलभाऊ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन याठिकाणी पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मिळण्याबाबत विनंती केली होती. त्यावर गांभीर्याने दखल घेऊन पूर संरक्षक भिंत बांधणेकामी 2 कोटी मंजूर झाले आहेत.
तसेच खानापूर तालुक्यातील घोटी खु. या गावातील जोतिबा मंदिराशेजारी ओढ्याला पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी रु. 25 लक्ष मंजूर करण्यात आले, खानापूर तालुक्यातील घोटी खु येथील जोतिबा मंदिरालगत ओढापात्र आहे व पावसाळ्यात त्याचेही पाणी मंदिरात येऊन भक्तांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. येथील लोकांच्या मागणीनुसार त्याही ओढापात्रा लगत संरक्षक भिंत बांधणे साठी निधी मंजूर झाला असून या दोन्ही कामांना मंजुरी आली असल्याचे सुहास बाबर यांनी सांगितले, लवकरच ही कामे सुरू करण्यात येऊन लोकांची होणारी गैरसोय टाळली जाणार आहे.
दरम्यान हे दोन्ही कामे भाऊंनी अखेरच्या कालावधीत पूर्ण केल्याने भावनिक झालेल्या या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी युवा नेते सुहास बाबर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली भविष्यात आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रमाणेच आपण सर्व जनतेच्या पाठीशी खंबीर उभे राहून कसलीही अडचण येणार नाही आमदार अनिल भाऊंची पुण्याई व सर्वसामान्यांचे पाठबळ आपणा सर्वांच्या पाठीशी आहे
सरकार आपलेच आहे त्यामुळे जनतेसाठी अहोरात्र कष्ट करणे हे स्वर्गीय भाऊंची आपणाला शिकवण आहे त्यांनी दिलेल्या शिकवणीवरच यापुढे वाटचाल करू असे आश्वासन सुहास बाबर यांनी दिले.