तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांचे प्रांत अधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन
तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी
त-हाडी :- १७ सप्टेंबर रोजी हातनुर धरणांचे दरवाजे खुले केल्यामुळे तापी नदीला पुर आल्यामुळे त-हाडी ममाणे शिवार मधील शेतातील केळी.कापूस मका पिक पाण्यात बुडाली आहेत तरी ममाणे शिवारातील ४० हेक्टर क्षेत्रावरील पिके २४ तास पाण्यात होती म्हणून
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे
हातूनर धरणाचे दरवाजे खुले केल्यामुळे तापी नदीला पुर आल्यामुळे तऱ्हाडी येथील ममाणे शिवारातील शेतकऱ्यांची शेती तापी नदीच्या काठावर असलेलल्या शेतकऱ्यांनच्या शेतात पाणी शिरल्याने केळी व कापूस व मका पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे तरी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आशेचे निवेदन त-हाडी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी शिरपूर यांना दिले व पंचनामे करून लवकर लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील व किरण भलकार शेतकरी सागर सोनवणे भाऊसाहेब पाटील रावसाहेब पाटील, नंदलाल हेमराज कश्यप (सोनवणे),
चतुर सोनवणे, रविंद्र पाटील, धनराज पाटील, शालिग्राम पाटील
रमेश पाटील,
पांडुरंग पाटील, वामन सोनवणे, महेंद्र धनगर, युवराज धनगर, लुका धनगर,
महेंद्र धनगर, ,
पुंडलिक धनगर, संतोष धनगर, या
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे उपस्थित होते
फोटो:-तापी नदीला पुर आल्यामुळे नदीच्या काठावर असलेल्या ममाणे शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने केळी व कापूस पिकांचे नुकसान झाले त्याचे प़ंचनामे करुन तात्काळ मदत मिळाली यासाठी शिरपूर प्रांतअधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन देताना तऱ्हाडी येथील शेतकरी







