वकीली व्यवसायात यशस्वितेसाठी कठोर परिश्रम गरजेचे !
अॅड.शामकांत पाटील यांचं प्रतिपादन
जिव्हाळा तर्फे अॅड.शामकांत पाटील यांचा सत्कार
धुळे : वकीली व्यवसाय हा समाजातील एक आदर्श व्यवसाय आहे.सामान्य नागरीकांना वकीलांकडून खूप अपेक्षा असतात.तेव्हा पिडीत घटकाला व अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळणेसाठी वकीलांनी घेतलेली मेहनत कामी येत असते. त्यामुळे वकीली व्यवसायात यशस्वितेसाठी कठोर परिश्रम गरजेचे असल्याचे प्रतिपादन धूळे जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा सरकारी वकील – अॅड.शामकांत रावजी पाटील यांनी केले.
जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीत संपन्न झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.अॅड.शामकांत पाटील यांच्या वकीली व्यवसायाला चाळीस वर्षे पूर्ण झाली.त्यानित्ताने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
अॅड.पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,
वकीली व्यवसायात समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क असायला.पक्षकार हित जोपासले गेले पाहिजे.न्यायालयीन संकेत व आदर राखला जाऊन वकीली व्यवसायातील नीती मूल्ये पाळली पाहिजेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिव्हाळा अॅडव्होकेट अॅकेडमीचे मुख्य संचालक अॅड.विनोद बोरसे यांनी अॅकेडमीचे वतीने घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.अॅड.विनोद बोरसे यांनी लिहिलेले ” अॅड.निर्मलकूमार सूर्यवंशी : जीवन – कार्य ” या पूस्तकासह जिव्हाळा विशेषांक व गूलाबपूष्प देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला . यावेळी अॅड.भूषण भामरे,अॅड.योगेश चौधरी,अॅड.प्रदीप शिंदे,अॅड.श्रीकांत पाटील, अॅड.समीर सोनवणे,अॅड.रवि पाटील,अॅड.प्रविण चौधरी,अॅड.नितेश बोरसे,अॅड.रामेश्वर कछवे ,अॅड.विजय सूर्यवंशी ,अॅड.गोविंद गढरी आदी उपस्थित होते.







