सरकारचा वोट बैंक असणाऱ्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न मात्र,नाभिक समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष.
त-हाडी
सकल नाभिक समाजाचा एल्गार दखल घेण्यासाठी भाग पाडणार….
लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील मोठी वोट बैंक असणाऱ्या जातींना खुश करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
आज
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सकल मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेतली. मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.
असे आश्वासन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांतग समाजाला दिले.तसेच दिनांक १५ सप्टेंबर रोजी धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समिती शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील.असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
अशावेळी नाभिक समाजाने केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी असे सरकारला वाटले नसावे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.राज्यात अल्पसंख्याक म्हणून गणला जाणारा नाभिक समाज हा संख्येने तर कमी आहेच.पण एकसंघ देखील नाही.त्यामुळेच कोणतेही सत्ताधारी हे नाभिक समाजाला वोट बैंक समजत नसून त्यांनी कायम दुर्लक्ष केले आहे.
अशा परिस्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाभिक समाजाने एकसंघ होऊन सकल नाभिक समाजाची ताकद दाखवून लढा उभारणे ही काळाची गरज झाली आहे.सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांच्या पुढाकाराने ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी पुकारण्यात आलेले आंदोलन हे निमित्त मात्र आहे.या आंदोलनातून सरकारला सकल नाभिक समाजाची ताकद दिसून एक संदेश दिला जाईल.
आम्हाला कमी लेखण्याची चुक करु नका,लढवय्या जातीची आम्ही लेकरे नडलो तर भल्या भल्यांना पाजू पाणी…




