दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…
दिघंची (ता. आटपाडी, जि. सांगली) : आषाढी पायी वारीच्या निमित्ताने साहिल भैय्या युथ फाऊंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी दोन दिवसांपासून फराळ तसेच अन्य आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा सुमारे दीड ते दोन हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.वारकरी सेवेचा वसा जपत फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सेवा बजावली. पायी वारीत सहभागी झालेल्या भाविकांना फराळ व आवश्यक साहित्याचे वितरण करून मानवसेवेतून विठ्ठलसेवा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत साहिल भैय्या युथ फाऊंडेशन विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे.
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम, तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविले जात आहेत..हा उपक्रमासाठी साहिल भैय्या देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्ष राजेंद्र सुखदेव घोलप, उपाध्यक्ष सचिन बबन घोलप, सचिव किरण भगत तसेच फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.वारकरी बांधवांनीही या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. सामाजिक कार्याबरोबरच वारकरी सेवेची जपणूक करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरातून स्वागत होत आहे.







