भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे केंद्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. NEET-UG सारख्या परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे.
फक्त शिक्षणच नाही तर देशातील विविध क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. यामुळे सामान्य नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि युवक हताश झाले आहेत. आता वेळ आली आहे की देशातील युवकांनी पुढाकार घेऊन या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवावा. इतिहास साक्षी आहे की कोणतीही मोठी क्रांती युवकांमुळेच शक्य झाली आहे.
जर युवक एकत्र आले तर निश्चितच बदल घडवू शकतात आणि सरकारला जबाबदार राहण्यास भाग पाडू शकतात
.सुरेश ईश्वर पोटे सिवूड, नवी मुंबई






