• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, August 27, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

स्पष्ट आणि परखड…नाना पटोलेंचे रिकामटेकडे उद्योग ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
August 22, 2026
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*स्पष्ट आणि परखड…**नाना पटोलेंचे रिकामटेकडे उद्योग* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.अमेरिकन सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे असा दावा काँग्रेसचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीवर बोलताना केला आहे.

त्यांच्या या विधानामुळे सहाजिकच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अमेरिकन सरकारने खरोखरी असा निर्णय घेतला असेल तर आतापर्यंत सर्व वृत्तवाहिन्यांवर तो प्रसारित व्हायला हवा होता. इतकेच काय पण देशातील सर्व प्रमुख दैनिकांमध्ये ती हेडलाईन असायला हवी होती. मात्र टीव्ही नाईन वर नाना पटोले यांनी सांगितले याव्यतिरिक्त कुठेही बातमी आलेली नाही. हे बघता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाना पटोले यांना खाजगीत फोन करून ही माहिती दिली की काय अशी शंका येण्यास वाव निश्चित आहे. दुसरे असे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अमेरिकेला किंवा त्यांच्या सरकारला आज तरी काही उपद्रव असल्याचे कोणाच्याच कानावर नाही.

त्यामुळे अमेरिकन सरकार उगाचच ही नसती उठा ठेव कशाला करेल हा देखील प्रश्न येतो. तरीही भारत आपला मित्र देश आहे, त्यामुळे भारतात काही उपद्रव होऊ नये या उदात्त हेतूने डोनाल्ड ट्रम्प यांनी असा संघाला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असेल तर सांगता येत नाही, पण आज ट्रम्प यांचे मित्र असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संघाचे स्वयंसेवक आहेत. मग ट्रम्प मोदींशी सुद्धा पंगा घेणार का हा देखील प्रश्न उपस्थित होतो.नाना पटोले हे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचे प्रॉडक्ट म्हणूनच ओळखले जातात. नाही म्हणायला डिसेंबर २००८ ते मे २०१८ या काळात ते ऑन डेप्युटेशन काँग्रेस मधून भाजपमध्ये आले होते खरे, पण आपण नरेंद्र मोदींशी भांडून भाजप सोडली असा दावा नानांनी केला होता.

आता नरेंद्र मोदींना नाना पटोले यांच्याशी भांडायला केव्हा वेळ मिळाला हा देखील एक संशोधनाचाच विषय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतात डाव्या संघटना आणि काँग्रेस यांचा कायम विरोध राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्ववादी भूमिका आणि डाव्यांची हिंदुत्व विरोधी भूमिका ही त्याला कारणीभूत ठरली आहे, तर काँग्रेसमध्ये नेहरूंच्या काळापासून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच आपला या देशातील एकमेव प्रतिस्पर्धी वाटत आला आहे. त्यामुळेच काँग्रेसने आतापर्यंत तीनदा संघावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस संघाला संपवू शकली नाही. इतकेच काय पण प्रत्येक बंदीनंतर संघ अधिक जोमाने वाढलेलाच दिसून आला आहे. तीनदा बंदी घालून देखील संघाने आपली १०० वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे आणि आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पोहोचून त्यांनी त्या त्या क्षेत्राशी संबंधित संघटना उभ्या केल्या आहेत, आणि त्या संघटना यशस्वीरित्या कामकाज करीत आहेत. त्याचवेळी १४० वर्ष जुना काँग्रेस पक्ष मात्र आज आचके देताना दिसतो आहे हे वास्तव देखील नाकारता येत नाही.काँग्रेसला संघाबाबत असलेला दुसरा पोटशुळ असा की संघाचेच अपत्य असलेला भारतीय जनता पक्ष हा सुरुवातीपासून काँग्रेसचा प्रमुख स्पर्धक राहिला आणि आज हळूहळू करत भाजपने काँग्रेसला सत्तेबाहेर फेकले आणि आज देशातील अर्ध्याअधिक राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. तर काँग्रेस चार-पाच राज्यांमध्ये फक्त सत्तेत राहिलेली आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जिथे जागा सापडेल, तिथे ज्या कडावर वळला त्या कडावर वार करायचे हेच काँग्रेसचे धोरण राहिले आहे.

मात्र अनेकदा त्यांचे हे वार अत्यंत फालतू आणि पोरकट असतात हे दिसून आले आहे. त्यातही हा पोरकटपणा खालपासून वरपर्यंत सर्वच जण करत आहेत. अगदी राहुल गांधींपासून तर गडचिरोलीच्या जंगलातल्या एखाद्या क्षुल्लक काँग्रेस कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकच जण संघावर तोंडसुख घेण्यात धन्यता मानतो. मग भलेही सामान्य माणूस त्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो, त्यांना त्याचे काहीही सोयर सुतक नसते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशातील ३६ बँकांमध्ये खाते आहे असा दावा गाना पटोले यांनी केला आहे.

आता संघटना जर चालवायची तर बँकेत खाती असायलाच हवीत. कारण कोणत्याही संघटनेला त्यांचा पारदर्शी कारभार लोकांसमोर ठेवायचा असेल तर दरवर्षी जमाखर्चाचा ताळेबंद मांडावा लागतो. सनदी लेखापालाकडून त्यांना हरितसर ऑडिट करून घ्यावे लागते. आणि ते सरकार दरबारी सादर करावे लागते. त्यासाठी सर्व व्यवहार बँकेमार्फत केलेले जास्त चांगले असतात. माझ्या माहितीप्रमाणे या सर्व प्रक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पार पाडत असतो. संघाचे प्रत्येक गावात कार्यालय आहे. प्रत्येक गावात स्वयंसेवक संघाला गुरुदक्षिणेच्या रूपात समर्पण राशी देत असतात. मग ती कोणत्यातरी बँक खात्यात जमा करावी लागणारच ना. त्यासाठी प्रत्येक गावात संघाची बँकेमध्ये खाती आहेत. तिथले अधिकारी ती खाती ऑपरेट करत असतात. त्याचा रीतसर हिशोब ते संघाला सादरही करत असतात. त्यामुळे संघाची किती बँकांमध्ये खाती आहेत,

ही नसती उठा ठेव नाना तुम्हाला करण्याची काय गरज हा प्रश्न जर कोणी विचारला तर तुम्ही रागावू नका. आता संघाच्या ३६ बँकांमधील खात्यांमध्ये पैसा कुठून येतो हा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला आहे. त्याचे उत्तर संघाने आपल्या सनदी लेखापालाला दिलेले आहे, इतकेच काय पण आयकर खात्याने जेव्हा जेव्हा विचारणा केली तेव्हा देखील संघाने उत्तर दिलेले आहे. माझ्या आठवणीनुसार १९७१ मध्ये संघाला मिळणारी गुरुदक्षिणा हे उत्पन्न समजून त्यावर आयकर लावण्यात यावा असे प्रयत्न सरकारकडून झाले होते. मात्र संघाने सरकार दरबारी दाद मागितली आणि संघाला त्यातून योग्य ती सूट देखील मिळालेली आहे, ही माझी माहिती आहे. अर्थात मी संघाचा कोणताही अधिकारी किंवा प्रवक्ता नाही. फक्त संघाचा एक अभ्यासक आहे. त्यामुळे नानांनी आयकर विभागाकडून किंवा संघाच्या सनदी लेखपालाकडून ही चौकशी करून घ्यावी आणि मगच आरोप करावे.

आता संघाच्या आर्थिक व्यवहाराबाबत नाना प्रश्न उपस्थित करतात. मात्र नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काय झाले या प्रश्नावर ते कधीच उत्तर देणार नाहीत. याच प्रश्नावर त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून ते दोघेही जामीनावर बाहेर फिरत आहेत, याची नाना आठवण विसरले असतील, तर त्यांना मला आठवण करून द्यावीशी वाटते. नॅशनल हेरॉल्ड हे फक्त एक प्रकरण आहे. अशी अनेक प्रकरणे काँग्रेसच्या संदर्भात आणि अनेक काँग्रेस नेत्यांच्या संदर्भात घडलेली आहेत. त्याचे खुलासे अजूनही देशातील जनतेला करण्यात आलेले नाहीत. व्यापक जनहित लक्षात घेऊन आणि नाना हे जनसामान्यांचे कैवारी असल्यामुळे त्यांनी हे खुलासे जनसामान्यांना कसे केले जातील याचा प्रयत्न निश्चित करावा. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर पक्षाने नानांना काहीच दिले नाही, म्हणून त्यांनी धानाला भाव दिला नाही हे निमित्त करत आधी आमदारकीचा राजीनामा दिला आणि मग काँग्रेस सोडली. नंतर भाजपमध्ये आल्यावर आधी आमदार आणि मग खासदार झाले, मात्र मी नरेंद्र मोदींशी भांडून बाहेर पडलो असे सांगत त्यांनी पुन्हा खासदारकीचा राजीनामा दिला आणि परत स्वगृही आले.

इथे काही त्यांना पुन्हा खासदारकी मिळाली नाही. पुन्हा आमदार बनवले आणि औटघटकेचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना खुर्ची दिली होती, नंतर तीही सोडावी लागली. त्यातही आधी प्रदेशाध्यक्ष तरी होते आता तिथूनही त्यांची सुट्टी झाली आहे. त्यामुळेच काही कामधंदा राहिला नाही. म्हणूनच असे बिनबुडाचे दावे आणि बिनबुडाचे आरोप नाना करत असतात. आता वेळ जात नसल्यामुळे त्यांना काहीतरी करावे लागते त्यामुळे असे रिकामटेकडे उद्योग ते करतात. मात्र लोक नानांवर काडीचाही विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळेच २०२४ मध्ये नानांना विधानसभेत निसटता विजय मिळाला होता याची आठवण देखील नानांना करून द्यावीशी वाटते. त्यामुळे आता नानांनी शांतपणे राजकारण संन्यास घ्यावा आणि नवेगाव बांधच्या जंगलात जाऊन पक्षी निरीक्षण करावे असा माझा त्यांना आपुलकीचा सल्ला आहे. अर्थात तो मानायचा की नाही हा निर्णय त्यांचाच राहणार आहे.. तोवर तरी त्यांचा हा अव्यापारेषु व्यापार सुरूच राहणार आहे हे चित्र आज तरी दिसते आहे.

Views: 29
Share

Related Posts

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
Uncategorized

मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले

August 26, 2026
शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप
Uncategorized

शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप

August 25, 2026
काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
Uncategorized

काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल

August 25, 2026
“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी
Uncategorized

“मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

August 24, 2026
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

पटतंय का बघा तरुणाईला विश्वासात घेऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे गरजेचे… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार,

August 23, 2026
आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती
Uncategorized

आंतरराष्ट्रीय सप्तऋषि आखाड्याच्या महाराष्ट्र प्रभारीपदी महामंडलेश्वर योगी राजुनाथजी महाराज यांची नियुक्ती

August 22, 2026
Next Post
आटपाडीच्या विकासासाठी दमदार नेतृत्वाची साथ ! दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मॅरेथॉन दौऱ्यातूनही दीड तास वेळ काढत आटपाडी नगरपंचायतीच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली.

आटपाडीच्या विकासासाठी दमदार नेतृत्वाची साथ ! दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मॅरेथॉन दौऱ्यातूनही दीड तास वेळ काढत आटपाडी नगरपंचायतीच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • मीटरवर रीडिंग ४ युनिट; वीज बिलावर थेट १४० युनिट!स्मार्ट मीटर बसवल्यापासून प्रकार वाढल्याचा ग्राहकांचा आरोप; प्रत्यक्ष रीडिंग न घेता अंदाजे युनिट टाकल्याने वाढीव बिले
  • शांत संयमी सरपंच सुरज पाटील टेंभूच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिकेत……दोन्ही तलावांत दोन महिन्यांत टेंभूचे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन….मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण होऊनही पाणी तलावांपासून दूरच; अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी काम रखडल्याचा आरोप
  • काजू बियांवर राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन होणे आवश्यक..पणन मंत्री जयकुमार रावल
  • “मी पोलिसाची नोकरी सोडून शिक्षण विभागात आलोय…” शिक्षण अधिकाऱ्यांचे वक्तव्य धमकी की मोठेपणा?शाळेतील स्वच्छतागृह विद्यार्थ्यांकडून स्वच्छ करून घेतल्याचा मुद्दा ऐरणीवर; चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची पालकांची मागणी

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)