टेंभू योजनेतील उर्वरित गावांचा समाविष्ट करण्याबाबत आमदार अनिलभाऊ बाबर यांची लक्ष्यवेधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास 1 महिन्यात मंजुरी ….
टेंभू योजनेतील उर्वरित गावांचा समाविष्ट करण्याबाबत आमदार अनिलभाऊ बाबर यांची लक्ष्यवेधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
आटपाडी प्रतिनिधी
टेंभू योजनेतील उर्वरित गावांचा समाविष्ट करण्याबाबत तसेच टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास मंजुरी मिळण्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये लक्ष्यवेधी उपस्थित केली. यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देत टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास 1 महिन्यात मंजुरी देणार असुन टेंभू योजनेतील उर्वरित गावांचा समाविष्ट करणार असल्याचे सांगितले.
आमदार बाबर म्हणाले, माझ्या मतदार संघातील टेंभू योजने पासुन अंदाजे 40 गावे वंचित आहेत, मागच्या वेळी आपण मुख्यमंत्री असताना 2019 साली मी आपणास विनंती केली होती की, माझ्या मतदारसंघातल्या वंचित गावांचा समावेश करावा. परंतु त्याच्यानंतर काही गावे वाढली. आणि जत, तासगाव, सांगोला, खटाव, माण अशा माझ्या तालुक्याच्या लगतच्या दुष्काळी तालुक्यातील गावाचा समावेश झाला आणि या सगळ्याची योजना तयार होउन तांत्रिक मान्यतेसाठी एस. एल. टी. ए. सी.कडे आली आहे.
माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, एस. एल. टी. ए. सी. कडून आठ दिवसात ही योजना मान्यता घेऊन एक महिन्याच्या आत किंवा 15 एप्रिल पर्यंत प्रशासकीय मान्यता मिळावी व 25 एप्रिल पर्यंत निविदाची कार्यवाही सुरु व्हावी अशी मागणी आमदार बाबर यानी केली.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस म्हणाले , मागच्या वेळेस टेंभू योजना ही प्रधानमंत्री योजनेत समाविष्ट करुन जवळपास त्या योजनेचा 80 टक्के भाग आपण संपविला आहे. 80 टक्के सिंचन योजना वापरत देखिल येत आहे. आता ही विस्तारित योजना आहे. याच्यामध्ये साधारणपणे 109 गावे आणि 41 हजार हेक्टर असा भाग येतो आहे. जवळपास 2 हजार 400 कोटी रुपये त्याकरिता लागणार आहेत. मागच्या वेळी आपण प्रधानमंत्री योजने अंतर्गत पी. डी. एन. पद्धत स्वीकारली , आणि ही पद्धत स्वीकारल्यामुळे मुळ जे पाणी आपल्याला उपलब्ध होणार होते त्यापेक्षा जास्त पाणी उपलब्ध व्हायला लागले, आणि म्हणुन या योजनांमध्ये अतिरिक्त पाणी असल्यामुळे अतिरिक्त गावे यामध्ये आपण समाविष्ट करू लागले आहोत तर या संदर्भात जी तिसरी सुप्रमा आपणाला द्यायची आहे.
त्यासाठी एप्रिल च्या अखेरपर्यंत एस. एल. टी. ए. सी. ची मान्यता घेऊ. अणि त्यानंतर एक महिन्याच्या आत टेंडर ची कार्यवाही असेही फडणविस यांनी सांगितले.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील घोटी बु, घोटी खु, रेणावी, रेवनगाव, धोंडगेवाडी, घाडगेवाडी, ऐनवाडी, जाधववाडी, जखिनवाडी, भडकेवाडी, बानुरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे (अंशतः विटा गुंफा, सुळेवाडी, भिकवडी बु, शेडगेवाडी)
आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी, तरसवाडी, गुळेवाडी, पिंपरी बु. पुजारवाडी (पांढरेवाडी),उंबरगाव, राजेवाडी, लिंगीवरे, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खु (अंशतः पडळकरवाडी, कुरुंदवाडी, काळेवाडी, खांजोडवाडी) तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल मधील विजयनगर कचरेवाडी किंदरवाडी,धोंडेवाडी, नरसेवाडी (अंशतः मोराळे, पेड, मांजर्डेदत्तनगर, पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर) या वंचित असणाऱ्या गावांना फायदा होणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये आपण मतदारांना जो शब्द दिला होता तो आज पूर्णत्वास येत असल्याचा आनंद होत आहे