आॅनलाईन सातबाऱ्यासाठी मोजावे लागणार २५ रुपये
त-हाडी -महागाईच्या झळा आता सरकारी कागदालाही बसू लागल्या आहेत. ऑनलाईन काढण्यात येणारा सातबारा उतारा आणि फेरफार नोंदीचे दर वाढवण्यात आले आहेत.यापूर्वी 15 रुपयांना मिळणारा सातबारा उतारा आता 25 रुपयांना मिळणार आहे.”पेपरलेस” कारभार करता करता “मनीलेस” कारभार होऊन बसला आहे, असे उपरोधीक पणे शेतकरी वर्ग बोलतो आहे.
फेरफार नोंदीसाठी यापूर्वी मोफत अर्ज करता येत होता. आता मात्र त्याकरिता 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या दोन पानांसाठी ही रक्कम आकारली जाईल. त्यापुढील प्रत्येक पानाला दोन रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहेत.या निर्णयामुळे शेतकरी, उद्योजक आणि इतर नागरिकांना मोठा फटका बसणार आहे
.सातबारा उतारा आणि फेरफार नोंदी हे विद्यार्थी उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज काढणे, शेत जमिनीचा खरेदी विक्रीच्या व्यवहार करणे आदी अनेक व्यवहारांसाठी आवश्यक असतात. यामुळे या व्यवहारांचे खर्च वाढणार आहेत.या निर्णयाबद्दल शेतकरी आणि उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता
महागाईच्या वाढत्या दबावामुळे सरकारला सातबारा उतारा आणि फेरफार नोंदीचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक ओझे वाढणार आहे.आगामी काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.






