आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील झिरो कामगारांना तहसीलदार सागर ढवळे यांनी दणका दिल्यामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची लूट थांबली असल्याने मनसेचे कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड दैनिक जनमत चे तालुका प्रतिनिधी सुधीर पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार सागर ढवळे यांना विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती देऊन सन्मान केला.
तहसीलदार सागर ढवळे यांनी खाजगी कामगारांना दणका दिल्यानंतर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार सागर ढवळे यांच्या कामाचे कौतुक केले व सन्मान केला. तालुक्यामध्ये न भूतो न भविष्य तो असा निर्णय तहसीलदार यांनी घेतल्यामुळे अनेक नागरिक व शेतकरी तहसीलदार यांचा सन्मान करीत आहेत.
त्याचबरोबर आता झिरो तलाठ्यांना सुद्धा दणका मिळणार का ? याकडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक शेतकरी अशिक्षित असतात त्यांना कागदपत्रांतील जास्त ज्ञान नसते. त्यामुळे तलाठी कार्यालया मध्ये अनेक झिरो तलाठी काम करीत आहेत. नव्हे तर अनेक दिवसापासून काम करीत आहेत. व अशिक्षित शेतकऱ्यांना भीती घालून आर्थिक उकळपट्टी करीत आहेत.
अशा या झिरो तलाठी कामगारांना शेतकरी व नागरिक वैतागून गेले आहेत .अजूनही तालुक्यांमध्ये अनेक कुटुंबांना दररोजची रोजी रोटी कशी मिळवायची हा गंभीर प्रश्न आहे. आणि त्यामध्येच तलाठी कार्यालय मध्ये आर्थिक लूट होत आहे . होणारी लूट तहसीलदार सागर ढवळे थांबविनार का ? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.







