शिंदे सरकारच्या बाजूने लागलेला ऐतिहासिक निर्णयाचे ढोलताशे लावून शिवसेना पदाधिकारी तर्फे ढोल ताशे वाजून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला…
अखेर सत्याचा विजय झाला….. 🚩
चाळीसगाव –
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे एकनाथजी शिंदे साहेब प्रारंभीपासूनच सांगत होते.
त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब करत आहेत हे सिद्ध झाले आहे.
पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.
हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल!
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सहकार्यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो.
याच ऐतिहासिक निकालाचा चाळीसगावात जल्लोष फटाके फोडून व ढोलताशे वाजून व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष राहुल पाटील सह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व अंगीकृत संघटनेचे मोठ्या संख्येने उपस्थित होते







