शिरपूर तालुक्यात बहुगुणी पळस फुलांनी परिसर सजला
त-हाडी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात बहुगुणी पळस फुलांनी परिसर सजला आहे.वसंत ऋतुमध्ये हिंदू धर्मियांच्या महत्याचा सण म्हणजे होळी देशभर साजरा केला जातो. धुलीवंदनाला एकमेकांना रंग लावून स्नेह द्विगुणित करून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात वरूळ ते अंकलेश्वर या राज्य मार्गावर पळस फुलांनी बहरलेले अनेक झाडे दिसून येत आहे.
पळस या झाडाला आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
पळसाची झाडे ही वेडी वाकडी आणि फारसी उंच नसतात त्यातच या झाडाची साल ही खरबडीत आणि राखांडी रंगाची असली तरीही पळसाची फुले मात्र माणसाचे मन मोहित करून घेतात. कोणाचीही नजर पळसाच्या रंगीबेरंगी फुलावर पडताच प्रत्येकाला आपलेसे वाटते. पळसाची रंगी बेरंगी फुले अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यास त्वचारोग नाहीसा होतो.
तसेच पळस झाडाच्या बियाचाही औषधी म्हणून उपयोग केला जातो. एकीकडे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या संत तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत परंतु मानवाने वृक्ष वनसंपदा नष्ट करण्याचा सपाटा लावला असला तरीही नष्ट होत असलेल्या वृक्षसंपदेत औषधी पळस फुलांचे सौंदर्य अधिक भर टाकतांना दिसून येत आहे.
शिशिर ऋतुमधे वातावरणातील गारवा लुप्त होऊन पानगळीने उघडी पडलेली वनसंपदा पळस फुलांच्या सौंदयांन रंग उधळतांना आपल्याला दिसते. तसेच आपले लक्ष वेधत असते. कुठेही गेले तरी ‘पळसाला पाने तीनच अशी म्हण आहे. तोच पळस चहुगुणी असून त्याच्या फुलांचा उपयोग होळीत रंग बनविण्यासाठी होती. पानांचा उपयोग ढोण, पत्रावळी, बिडी निर्मितीसाठी केला जातो.
पळस हा खडकाळ, हलकी व मध्यम निचरा होणाऱ्या जमिनीत विशेषतः उगवतो. शेताच्या धुऱ्यावर आढळणारा पळस पानगळ वृक्ष असून झाडांची पाने गळून गेली की, मग पळसाच्या फुलांचे घड
येतात. सच्या निसर्गात केशरी, भगवा, पंधरा आणि पिवळा अशा विविध रंगाची फुले आढळून येतात. बहुगुणी असलेला हा पळस काही भाग वगळता वगळता मानवाच्या अवैध वृक्षतोडीमुळे दुर्मिळ होताना दिसत असला तरीही आहे. जाळीचा देव ते अजिंठा या राज्य मार्गावरील पडीक जमिनीवरील माळरानावर तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पळस चांगलाच चहरलेला दिसून येत आहे
.पळस झाडाच्या फुलांना शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. या फुलांची पाने ही अनेक त्वचा रोगांवर प्रभावी ठरतात तसेच या झाडाची साल ही जखम भरण्यासाठी वापरली जाते. अशा अनेक उपयोगी पडणारा हा पळस वृक्ष आहे. पळसफुलांची गुच्छ पाण्यात टाकली की, पळसफुले पाण्यात भिजू घालून ठेसून त्यापासून भगवा नैसर्गिक रंग तयार होतो. पूर्वी रंगपंचमीच्या दिवशी पळस फुलांचा रंग वापरला जायचा. याच रंगाने रंगपचंमी उत्सव साजरा होत असे. परंतु आज प्रत्येकाला वेळ नाही म्हणून बाजारपेठेत उपलब्ध असलेले कृत्रिम रंग विकत घेऊन त-हाडी परिसरात रंगपंचमी साजरी केली जाते.







