माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड
आटपाडी प्रतिनिधी
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद च्या सदस्या माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. या वेळी बोलताना माधवी पडळकर बोलताना म्हणाल्या या समितीवर कार्य करताना जलव्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनहिताभिमुख पद्धतीने चालावे यासाठी मी सदैव तत्पर राहून प्रयत्न करणार आहे.
तसेच, सर्वसाधारण सभेदरम्यान आटपाडी तालुक्यातील विविध समस्या सभागृहात मांडल्या. त्यामध्ये दलित वस्तीत झालेली चुकीच्या पद्धतीची कामे, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता आदी महत्त्वाचे प्रश्न अध्यक्ष महोदया व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.जिल्हापरिषद ची पहिलीच सर्वसाधारण सभा ठरली तर पहिल्याच सभेत माधवी पडळकर यांनी आवाज उठवला व प्रश्नांची सरबत्ती उठविली .जिल्हापरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा ही अनपेक्षित रित्या वादळी ठरली. विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर कामकाजाला सुरवात झाली.जी प सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी निवड झाली. स्वच्छतेच्या कामाचे टेंडर असेल, गाड्यांच्या विलगीकरणाचा आणि लिलावाचा प्रश्न चांगलाच तापला. जिल्हापरिषदेच्या मुद्रणालयाच्या पेपर खरेदीच्या विषयावरून ही सदस्यांनी सत्ताधाऱ्यांची दमछाक केली.
जी. प.सदस्या माधवी पडळकर यांनीही पहिल्याच बैठकीत प्रश्न मांडून पुढची सूचकता दाखवून दिली. सोबतीला सुनील पवार, विनायक मासाळ, तसेच इतर सदस्यांनी आपले आपले प्रश्न सभागृहात मांडले. संपूर्ण बैठकीत प्रस्तावना सोडून अध्यक्षांनी चकार शब्द ही काढला नाही ही गोष्ट विशेष ठरली. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सगळी कमान उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी सांभाळली.
सर्व प्रश्नांना उत्तर एकटे लाड देत राहिले. अधिकाऱ्यांची उत्तर देताना दमछाक झाली, यावेळी अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, मुख्याधिकारी विशाल नरवडे,आणि इतर सर्व अधिकारी वर्ग आणि सदस्य हजर होते. तसेच या सभेस अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती, अधिकारी वर्ग व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







