मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण
महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे काम सुरू करावे,आटपाडी कचरा मुक्त करावी यासाठी आटपाडी येथे 23 एप्रिल पासून उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या नियोजनाच्या प्रती प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व संबंधित कार्यालयाला पाठवलेले आहेत. निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामात चा शुभारंभ होऊन अनेक वर्षे लोटली असली तरी अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
ही बाब केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शिवप्रेमी व देशप्रेमी नागरिकांसाठी अत्यंत वेदनादायी आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात समुद्रामध्ये भव्य, दिव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे.या स्मारकामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचेल.महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन वाढीस चालना मिळेल.पर्यटनातून मिळणारा महसूल समाजातील गरजू, विद्यार्थ्यांसाठी, शेतकरी व व्यवसायिकांसाठी उपयोगात आणता येईल.देशाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला अधिक बळकटी मिळेल.तथापि, या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून का प्रलंबित आहे. याबाबत स्पष्ट माहिती जनतेसमोर आलेली नाही. तसेच, आलेले अडथळे अद्याप का दूर करण्यात आले नाहीत,
याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे.तसेच या निवेदनात अनेक मुद्दे मांडले आहेत यामध्ये,या स्मारकाच्या प्रलंबित कामाबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावे.प्रकल्पासमोरील अडथळे तात्काळ दूर करावेत. येत्या 1 मे 2026 पासून स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात यावे. आवश्यक असल्यास नागरिक व शिवप्रेमींकडून निधी उभारणीचा पर्याय विचारात घ्यावा.तसेच, या मागणीसाठी आम्ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे दिनांक 23 एप्रिल 2026 पासून शांततापूर्ण, कायदेशीर व संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करणार आहोत.
आमचा उद्देश केवळ शासनाचे लक्ष वेधून घेणे हा असून आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पाडले जाईल.पण जर याची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा विचार करावे लागेल असेही निवेदनात म्हंटले आहे. तसेच आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सकारात्मक निर्णय घ्याल, अशी आम्हा सर्व शिवप्रेमींची अपेक्षा आहे.फोटो.. महेश पाटील समुद्रातील नियोजित स्मारकशिल्लक आहेShow quoted text







