तहसीलदार सागर ढवळे यांचे काम उत्कृष्टच…. एजंटगिरी बंद झाल्याने तह ढवळे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र … वैशाली शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या)
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांचे काम उत्कृष्ट रित्या सुरू आहे . परंतु त्यांच्या कामाला गालबोट लावण्यासाठी काही नागरिकांनी चुकीचे फोटो काढून वाळू तस्करीला अभय असल्याबाबत तहसीलदार सागर ढवळे यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
परंतु जे फोटो आहेत हे जुने फोटो आहेत. अशी कोणत्याही पद्धतीची वाळू तस्करी सुरू नाही. परंतु काही जणांची आपली दुकाने बंद पडल्याने तहसीलदार सागर ढवळे यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे यांनी दिली आहे.तर याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यापूर्वीचे तहसीलदार यांच्या काळामध्ये तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दिवसाढवळ्या वाळूची तस्करी होत होती. तहसील कार्यालया मध्ये कर्मचारी बेशिस्त वागत होते. प्रशासकीय कामासाठी लोकांना त्रास होत होता. खाजगी एजंट प्रशासकीय खुर्चीवर बसून बोगस कामे करीत होते.
दिवसा ढवळ्या तालुक्यामध्ये होत असलेली वाळू तस्करी त्यांना दिसत नव्हती. प्रशासकीय कामासाठी होत असलेला नागरिकांना त्रास दिसत नव्हता. का ? तहसील कार्यामध्ये खाजगी एजंटचा सुळसुळाट त्यांना दिसत नव्हता का. तर उलट श्रीमती तहसीलदार माने यांना पाठीशी घालत होते. त्यांचे गुणगान गात होते. वैयक्तिक कामांमध्ये त्यांना मदत करत होते.
तह श्रीमती मानेंच्या विरोधात अनेक तक्रारी वाढत होत्या. वाळू तस्करी जोमाने चालू होती. वाळू तस्करी मध्ये पकडलेली वाहने खुलेआम गायब होत होती.
अशा परिस्थितीमध्ये जनसामान्यांची तक्रार लक्षात घेऊन मा.महसूल मंत्री तसेच महसूल सचिव यांनी तह. माने यांची आटपाडी तालुक्यातून बदली केली.
सध्या आटपाडी तालुक्याला नवीन यंग तहसीलदार मिळाले. नूतन तहसीलदार सागर ढवळे यांनी तहसीलदार पदाचा कारभार हाती घेताच तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठे बदल झाले. त्यांनी चार्ज घेतल्यापासून तहसील कार्यालयातील कर्मचारी शिस्तबद्ध पद्धतीने काम करायला लागले. शासकीय कर्मचाऱ्यांची आवो जाओ घर तुम्हारा ही पद्धत बंद झाली. संजय गांधी निराधार विभागांमध्ये शासकीय कामासाठी महिलांना होत असलेला त्रास थांबला आहे. तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी तसेच , प्रशासकीय कामांमध्ये जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी धाडसी निर्णय घेतले.
नवीन तहसीलदार आल्यापासून सामान्य माणसांची कामे सुरळीतपणे जलद गतीने चालू आहेत. प्रत्येक सामान्य माणसाचे काम होत आहे. न्याय भेटत आहे. तह.ढवळे यांनी आल्यापासून दबावाळा बळी न पडता दहा ते पंधरा वाळू तस्करी वाहनांवर धाडसी कारवाई केली आहे. आठवड्यातून दोन वेळा तहसील कार्यालयातील शौचालयाची स्वच्छता होत आहे. नवीन तहसीलदार सागर ढवळे यांचे तालुक्यांमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र गुणगान होत आहे. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
परंतु तहसीलदारांचे उत्कृष्टपणे जनतेसाठी चाललेले कामकाज हे यापूर्वीचे तहसीलदार यांचे निकटवर्तीय यांना चांगलेच झोंबत आहे. त्या काळात हेच तक्रारदार मुक्याचे सोंग घेऊन तहसिलदारांची पाठराखण करत होते. परंतु तह माने यांची बदली झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि या दुःखातून नैरशातून बाई मानेंचे चाहते श्रीमती बाई मानेंच्या काळातील उत्खनन नदीपत्रातील जुन्या खड्ड्यामध्ये उभे राहून वाळू तस्करी होत असल्याचा बालिश बुद्धीने भंपक दावा करत आहेत.
नवीन तहसीलदारांचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालू असताना त्यांना त्रास देण्याच्या हेतूने.काही जण बालिश बुद्धीने खोडसाळपणा करत आहेत. एकंदरीत नैराश्यातून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे.
चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना न्याय देणाऱ्या तहसीलदारांना कोण जाणून बुजून त्रास देत असेल त्यांची बदनामी करत असेल तर अशा समाजकंटकाच्या विरोधात निराधार महिलांच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे यांनी दिला आहे.