पाऊस पडेना, ढेकुळ काय फुटेना
पावसाअभावी पेरण्या लंबल्या
आटपाडी परिसरामध्ये पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्या आहेत. राणाच्या मशागती करून शेतकऱ्यांनी ठेवल्या आहेत. पेरणी करायची म्हटलं तर पाऊस पडायला हवा आहे. परंतु पाऊस लांबल्याने पेरण्या लांबल्या आहेत.
ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी मका,भुईमुग,कांदा व अन्य पाण्यावर येणारी पिके पेरली आहेत. परंतु बाजरी,मग,मटकी ची पेरणी अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी रणाच्या मशागती झाल्या नाहीत. प्रत्येक शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.
ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था नाही.त्या शेतकऱ्यांची बाजरी, मूग, मटकी, उडीद अशी पिके पावसावर येतात परंतु पाऊसच मोठ्या प्रमाणात पडला नसल्यामुळे परिसरातील पेरण्या लाभल्या आहेत.
सध्या अधून मधून रिपरिप पाऊस येत आहे. परंतु जमिनीमध्ये ओलावा नसल्याने पेरणीचं धाडस कोणी करेना. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्याने पेरणी केलेली आहे. परंतु जास्तीत जास्त शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पाऊस नसल्यामुळे रानाची नांगरट करून सुद्धा राणे पडून आहेत. मशागत करायची म्हटलं तर रानातील नांगरलेली ढेकळे फुटत नाहीत त्यामुळे मशागत करून तरी काय फायदा ?आज _उद्या पाऊस येईल. पावसाने ढेकळे भिजल्यानंतर ते फुटतील म्हणून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.